मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होणारच
म. टा. वृत्तसेवा, धुळे, Mar 10, 2015
मनमाड-धुळे- इंदूर रेल्वे मार्गाची मागणी जुनी असली, तरी हा विषय रेल्वे मंत्रालयाच्या अजेंड्यावर नव्हताच. हे सत्य आपण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर निदर्शनास आणले. विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा मार्ग पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली असून, त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करणे क्रमप्राप्त असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री प्रभू यांनी चित्रफितीच्या माध्यमातून धुळेकर जनतेला उद्देशून साधलेला संवादही यावेळी दाखविण्यात आला.
भामरे...
more... म्हणाले की, आपण खासदार म्हणून वारंवार या विषयासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी भेटत आहोत. प्रभू यांनी स्पेशल पर्पज व्हेईकल मॉडेलच्या माध्यमातून फंड उभा करण्याचे नियोजन केले असून, त्यातून देशातील यापूर्वीचे सर्व प्रस्तावित व प्रलंबित रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे ठरविले आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. आजवर हा रेल्वेमार्ग मंजूरच नाही. त्यामुळे त्यावर आर्थिक तरतूद होण्याचाही प्रश्नच येत नाही. मात्र, प्रस्तावित मार्गामध्ये याचा समावेश आहे, हे खरे. यापूर्वी झालेले सर्वेक्षण आता कालबाह्य असून, आता शास्त्रोक्त पध्दतीने नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठीच रेल्वेच्या या अर्थसंकल्पात सर्वेक्षणावर खर्चाची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे घटकराज्यांशी भागीदारी व इक्विटीच्या माध्यमातून निधी उभारून ते मार्ग करण्यात येणार आहेत. त्यासाठी एफडीआय, पीपीपी ही माध्यमे आहेत, तर पीएसयूसोबत भागीदारी करून सर्वप्रथम देशाचा रेल्वेविभाग ट्रॅकवर आणण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच नवीन कोणताही रेल्वेमार्ग या अर्थसंकल्पात मंजूर केलेला नाही. परंतु, येत्या तीन वर्षांत मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग करण्याची ग्वाही प्रभू यांनी दिली असून, त्यासाठी आपण पाठपुरावा करत राहणार आहोत, असेही खासदार डॉ. भामरे म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातून दोन नव्या रेल्वे
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जळगावचे खासदार ए. टी. पाटील यांनी जिल्हा व परिसरासाठी दोन नव्या ट्रेन सुरू करण्यात यश मिळविले आहे. मार्च महिन्यापासून बहुप्रतिक्षित दादर-भुसावळ आणि भुसावळ-धुळे या दोन रेल्वे जिल्ह्यातून धावणार आहेत. यासाठी जळगावचे खासदार ए. टी. नाना पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानले आहे. दादर-भुसावळ (ट्रेन क्र. 01081/01082) ही रेल्वे सुरू करण्याची गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी होती. यासाठी गेल्या सहा वर्षात सातत्याने रेल्वे मंत्र्यांना पाठपुराव्याचे पत्र देण्यात आले होते. मात्र केंद्रातील रेल्वे मंत्री पदावर सुरेश प्रभू आल्यानंतर त्यांनी या प्रलंबित मागणीचा निपटारा केला आहे. याशिवाय भुसावळ-धुळे ही देखील ग्रामीण भागासाठी अत्यंत आवश्यक रेल्वे होती. (ट्रेन क्र. 01405/01406) या रेल्वेला देखील हिरवी झेंडा मिळाला आहे. या दोनही रेल्वे नजीकच्या काळात सुरू होत असल्याबद्दल ए. टी. नाना पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आनंद व्यक्त केला आहे. रेल्वे मंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना या परिसरातील या दोन प्रलंबित गाड्यांच्या आवश्यकतेची माहितीही दिली. रेल्वे मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी दादर-भुसावळ रेल्वेला जळगाव आणि पाचोरा येथेही थांबा देण्यात यावा. तसेच भुसावळ-धुळे या नव्या रेल्वेला म्हसवद, काजगाव या ठिकाणी थांबा देण्याची मागणी केली आहे. याशिवाय प्रलंबित रेल्वे मागण्यांबाबतही आज रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लवकरच जळगाव व परिसराच्या प्रलंबित मागण्या मान्य होईल अशी आशाही ए. टी. नाना पाटील यांनी व्यक्त केली आहे.
पुरेशा डब्यांअभावी 'महाराष्ट्र'च्या प्रवाशांचे हाल
रेल्वेच्या रहदारीच्या मार्गांवरील गाड्यांना असेलल्या डब्यांची संख्या २२ वरून २४ करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली असली तरी राज्याची दोन टोके जोडणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे डबे केव्हा वाढविणार, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. या गाडीला सध्या १८ डबे आहेत. महाराष्ट्र एक्सप्रेसला दररोज अप-डाऊन करणाऱ्या नोकरदारांची मोठी गर्दी असते. या गाडीने प्रवास करणाऱ्यांमध्ये भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यातील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण त्या तुलनेत डबे कमी असल्याने त्यांचे हाल होतात. सध्या गाडीला १८ डबे आहेत. ते वाढवून २० ते २२ करावेत, अशी मागणी होत आहे. परंतु, या प्रश्नावर दोन्ही जिल्ह्यातील खासदार मौन बाळगून असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे.
नेत्यांकडे नाही वेळ
महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया हे १३४६ कि. मी. चे अंतर २८ तास ४५ मिनिटांत पूर्ण करते. प्रति तास ४८ ते ५० कि.मी. वेगाने ही गाडी धावते. १९७२ पासून सुरू असलेल्या या गाडीमुळे राज्याची दोन टोके जोडली जात असली तरी त्यातून प्रवास करणांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला नेत्यांकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
दररोज अप-डाऊन करणाऱ्यांसाठी महाराष्ट्र एक्सप्रेस सोयीची असली तरी या गाडीला डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होतात. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन तत्काळ डबे वाढविण्याची गरज आहे. - वैभव भंडारी, चाळीसगाव
#ManmadIndoreRail #ManmadIndoreclick here